हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

खरीप हंगामाच्या तोंडावर धुळ्यात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद; खत कंपन्यांची ‘लिंकिंग’ आणि जाचक नियमांविरोधात संताप..

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर धुळे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शासनाचे जाचक नियम आणि खत कंपन्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून हा संप पुकारण्यात आला आहे. खत कंपन्यांकडून युरियासोबत इतर अनावश्यक खते घेण्याची केली जाणारी सक्ती, अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांची होणारी सर्रास विक्री, साथी पोर्टल ॲपच्या माध्यमातून बियाणे विक्रीची सक्ती, आणि नवीन लागू होणारे जाचक बियाणे व कीटकनाशके कायदे याविरोधात विक्रेत्यांमध्ये मोठा असंतोष आहे. यासोबतच, शासनाने परवाना दिलेला आणि कंपन्यांकडून आलेला सीलबंद माल विकूनही जर बियाणे किंवा खतांचे सॅम्पल फेल गेले, तर थेट किरकोळ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले जातात, ही कारवाई थांबवण्याची प्रमुख मागणी असोसिएशनकडून करण्यात आली आहे.

कृषी सेवा केंद्र चालकांनी दिलेल्या माहितीनुसार, या जाचक अटींमुळे केवळ विक्रेत्यांचेच आर्थिक नुकसान होत नाही, तर शेतकरीही नाहक भरडला जात आहे. खत कंपन्यांच्या ‘लिंकिंग’ धोरणामुळे शेतकऱ्यांना पैशांची कमतरता असतानाही अनावश्यक खते घ्यावी लागतात, ज्यामुळे त्यांना कर्ज काढावे लागते. तसेच यामुळे बाजारात युरियाचा कृत्रिम तुटवडा आणि काळाबाजार निर्माण होऊन शेतकऱ्यांना चढ्या भावाने खते खरेदी करावी लागत आहेत. विक्रेत्यांची शेतकऱ्यांप्रती पूर्ण सहानुभूती असली तरी, शासनाचे डोळे उघडण्यासाठी हा संप अपरिहार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जोपर्यंत शासन या जाचक नियमांमध्ये शिथिलता आणून मागण्या मान्य करत नाही आणि तसे लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत हा बेमुदत बंद असाच सुरू राहील, असा ठाम इशारा कृषी सेवा केंद्र चालकांनी दिला आहे.

IMG_20260427_23195669

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!