हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

गॅस टंचाईवरून शिंदखेड्यात नागरिक संतप्त,चक्का जाम आंदोलन

शिंदखेडा : शहरात गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. अक्षय तृतीया सण तोंडावर असतानाही गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गॅस एजन्सीचे कार्यालय बंद असल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी सुमारे हजारभर ग्राहकांनी भगवा चौकात चक्का जाम आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
शहरात माणिक गॅस एजन्सी, अरुणाई गॅस एजन्सी (एचपी) तसेच भारत गॅस एजन्सीमार्फत गॅस पुरवठा केला जातो. मात्र माणिक गॅस एजन्सीचे स्थानिक कार्यालय मागील आठवडाभर बंद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कार्यालयाबाहेर “बुकिंग केलेल्यांना घरपोच सिलेंडर मिळेल” असा फलक असला तरी प्रत्यक्षात 10 ते 15 दिवस उलटूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार आहे.
गॅसच्या प्रतीक्षेत ग्रामीण भागातील नागरिक पहाटेपासून रांगा लावत असून एजन्सीसमोर सिलेंडरची मोठी लाईन लागलेली आहे. सणाच्या काळातही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
आंदोलनकर्त्यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, गॅस गाड्या येत असल्या तरी काही हॉटेल व्यावसायिक व ‘व्हीआयपी’ ग्राहकांना प्राधान्य देऊन रस्त्यातूनच सिलेंडर वाटप केले जाते. काही ठिकाणी सिलेंडर 2000 रुपयांपर्यंत विकले जात असल्याचाही आरोप करण्यात आला.
याशिवाय केवायसी प्रक्रियेसाठी 150 ते 200 रुपये आकारून आर्थिक शोषण होत असल्याची तक्रार आहे. मोबाईल नंबर बदललेल्या ग्राहकांचा गैरफायदा घेत अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!