हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अतिक्रमणाच्या तक्रारीवरून ग्रामसभेत नवी अंतुर्ली येथे राडा, परस्परविरोधी तक्रारी

शिरपूर (ता. प्रतिनिधी) तालुक्यातील नवी अंतुर्ली येथे गल्लीतल्या अतिक्रमणावरून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी २६ जानेवारी सकाळी ग्रामसभेच्या वेळेस वाद निर्माण झाल्याने मारहाण व शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करीत दोन्ही गटाकडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने एकूण 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद विश्वास ईशी (वय ३३, रा. नवी अंतुर्ली) यांनी गल्लीत झालेल्या अतिक्रमणाबाबत यापूर्वी बीडीओ शिरपूर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता.या अर्जाचा राग धरून गल्लीतील रहिवासी भिमराव संतोष ईशी व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्यासह कुटुंबीयांशी वारंवार वाद घातल्याचा आरोप विनोद ईशी यांनी केला आहे. तक्रारीनुसार, २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विनोद ईशी हे वडील विश्वास दगा ईशी, चुलत भाऊ योगिराज वेडु ईशी व काका बापू हिरामण ईशी यांच्यासह ग्रामसभेला जात असताना गावातील मंदिराजवळ भिमराव संतोष ईशी व अमीत ईशी यांनी अडवून “अतिक्रमणाबाबतचा अर्ज मागे घे” अशी धमकी दिली.यावेळी अमीत ईशी याने लाकडी काठीने विनोद ईशी यांच्या डाव्या पायावर मारहाण करून गळा पकडल्याचा आरोप करण्यात आला आहे.भांडण सोडविण्यासाठी आलेल्या योगिराज ईशी यांनाही शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, मंगलबाई भिमराव ईशी व अभिजीत भिमराव ईशी यांनीही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर सरपंच धर्मेंद्र प्रकाश ईशी व ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून भांडण सोडवले.दरम्यान,या घटनेबाबत भिमराव संतोष ईशी यांनीही शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विनोद विश्वास ईशी व त्यांच्या कुटुंबीयांनी घराच्या पाठीमागील गल्लीत कॅम्पाउंड उभारण्यास सुरुवात केली. सदर गल्ली सार्वजनिक रस्ता असल्याचे सांगितल्याचा राग आल्याने विनोद ईशी यांनी काठीने उजव्या हाताच्या दंडावर मारहाण केल्याचा आरोप भिमराव ईशी यांनी केला आहे. तसेच भरत विश्वास ईशी, विश्वास दगा ईशी व पिंटू वेडु ईशी यांनीही शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद आहे. ही भांडण जितेंद्र तुकाराम ईशी व मंगेश रावा ईशी यांनी सोडविल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ मनोज पाटील करीत आहेत.
अतिक्रमणाच्या वादामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले असून प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!