हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

बदली करा, नाहीतर जीव जाईल..ग्राम अधिकार्‍याचे साकडे

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

माझी तातडीने बदली करा, तो पर्यंत मी कामावर जाणार नाही. गावातील एकापासून माझ्या जिवाला धोका आहे असे धक्कादायक पत्र वरिष्ठांना थाळनेर येथील ग्रामविस्तार अधिकारी जी.के.वेताळे यांनी दिले आहे. 10 एप्रिलपासून ते थाळनेरला जाणार नसून अतिरिक्त कार्यभार असलेल्या ग्रामपंचायती सांभाळणार आहेत.

वेताळे थाळनेरला 2017 पासून नियुक्त आहेत. 2023 मध्ये त्यांच्या नियुक्तीला सहा वषे पूर्ण होतील. सात एप्रिलला ते ग्रामपंचायतीमध्ये कामकाज करीत असतांना गावातील वामन रामचंद्र कोळी हा तेथे गेला. त्याने कामकाजासंदर्भात काही प्रश्न विचारले. 29 मार्चला झालेल्या ग्रामसभेच्या प्रोसिडींगबाबत वेताळे यांनी माहिती दिली. मात्र त्यानंतरही संताप व्यक्त करुन कोळी याने टेबल वेताळे यांच्या अंगावर ढकलून दिले. त्यावरील चहा अंगावर सांडल्याने त्यांचे कपडे खराब झाले. कोळी याने त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे आपल्या जीवाला धोका असून यापुढे थाळनेर ग्रामपंचायतीमध्ये न जाता अतिरिक्त कार्यभार असलेल कुवे व विखरण येथील कारभार पाहणार असल्याचे वेताळे यांनी अर्जात म्हटले आहे.

या प्रकारानंतर वेताळे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा का दाखल केला नाही ?, त्यांना खरोखर जिवाला धोका वाटतो आहे की त्यामागे काही वेगळेच कारण आहे अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!