हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

लव्हस्टोरीचा भयानक एन्ड

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

साहेब, मी माझ्या पत्नीचा गळा चार्जर केबलने आवळून तिचा खून केलाय, मला अटक करा अशी विनवणी त्या तरुणाने केली आणि अख्खे तालुका पोलिस ठाणे हादरले.

लव्ह मॅरेज केल्यानंतरचा अवघा तीन वर्षांचा संसार…संसारवेलीवर दीड वर्षांपूर्वी एक गोंडस मुलीच्या रूपाने फुल उमललेले..पण विसंवादाचे थैमान सुरू झाले आणि त्याची परिणीती या भयानक गुन्ह्यात झाली.

जळगाव येथील निमखेडी शिवारातील
ब्रह्मांडनायक अपार्टमेंटमध्ये जितेंद्र संजय पाटील (वय २५) याने पत्नी कविताचा मोबाईलचार्जरच्या बने गळा आवळून खून केला. पत्नीशी संशयावरून भांडण झाल्याने त्याने हे कृत्य केले.  खून करून जितेंद्र  पोलिस ठाण्यात हजर झाला.

आहुजानगर परिसरातील शिवधाम मंदिराजवळ ब्रह्मांडनायक अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये जितेंद्र व कविता पाटील हे दांपत्य वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी हे दांपत्य बांभोरी येथून जळगावात राहण्यासाठी आले होते. एक ऑक्टोबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पत्ती जितेंद्र याने कविताचा चार्जर केबलने गळा आवळला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर तो  स्वतः तालुका पोलिस ठाण्यात हजर झाला.

अशी झाली अखेर

जितेंद्र मूळ बांभोरी (ता. धरणगाव) येथील रहिवासी आहे. त्याचा आणि कविताचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर त्याला पत्नीच्या वर्तणुकीबाबत संशय आला. त्यासंदर्भात पत्नीला अनेकवेळेस समजावले. परंतु ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. बदनामी टाळण्यासाठी तिच्यासाठीच मी गाव सोडून जळगावात मुद्दाम तिचे माहेर असलेल्या शिवधाम मंदिर परिसरात स्थायिक झालो. मात्र, पत्नीच्या वागणुकीत बदल झाला नाही. कविताला जीव तोडून समजावले. पण, ती उलट मलाच आत्महत्या करून फसवून टाकण्याची धमकी देत  होती. आजही तिला समजून सांगत असताना वाद घातला. वाद टोकाला गेला अन् मोबाईल चार्जरों वायरने गळफास देत मीच तिची हत्या केली असे जितेंद्र याने पोलिसांना सांगितले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!