हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तो अपघात ट्रॅक्टरचालकाच्या निष्काळजीपणामुळेच !

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर निष्काळजीपणे ट्रॅक्टर उभे केल्याने कार त्याला धडकली. त्यामुळे अपघात होऊन पाचजण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले. अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रॅक्टरचा चालकही अपघातात ठार झाला. त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

एक ऑगस्टला दुपारी साडेचारला गव्हाणे फाट्याजवळ फर्ग्युसन ट्रॅक्टरला ह्युंदाई व्हर्ना कार धडकून अपघात झाला होता. त्यात शिरपूरकडून नाशिककडे जाणारे संदीप शिवाजी चव्हाण, मीना संदीप चव्हाण, जान्हवी तथा परी संदीप चव्हाण (तिघे रा.उत्तम नगर, नाशिक), हितेश अरुण चौधरी (रा.म्हसरुळ, नाशिक) व पांडूरंग धना माळी (रा.सोनगीर) हे ठार झाले होते. टॅ्रक्टर महामार्गाची डागडुजी करण्यासाठी आणले असून ते निष्काळजीपणे रस्त्यात उभे केल्याने अपघात झाल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी मृत ट्रॅक्टरचालक पांडूरंग माळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!