क्राईम ब्लास्ट ब्यूरो
मुंबई आग्रा हायवेवर सांगवी गावाजवळ रस्ता ओलांडताना एकाला 22 जूनला सकाळी कंटेनरने धडक दिली. या अपघातात तो जागीच ठार झाला. तीन दिवसांत चार जणांचे अपघाती बळी गेल्यामुळे ग्रामस्थांनी रास्ता रोको करून संताप व्यक्त केला. या उद्रेकानंतर धुळे पळासनेर टोलवे कंपनीला जाग येऊन सांगवी गावाजवळ मोठा स्पीडब्रेकर टाकण्यात आला.
मध्यप्रदेशातील रहिवासी असलेला पठाण जमऱ्या (45) हा रस्ता ओलांडत असतांना त्याला कंटेनरने धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. तीन दिवसांत चौथा बळी गेल्याने ग्रामस्थांनी तासभर रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. डीवायएसपी अनिल माने, एपीआय सुरेश शिरसाट यांनी त्यांची समजूत घातली. त्यानंतर टोलवे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळाजवळ मोठा स्पीड ब्रेकर तयार केला. यापूर्वी तेथे दोन दुचाकीस्वार व एक पादचारी अपघातात ठार झाले आहेत.