क्राईम ब्लास्ट ब्यूरो
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वृद्धाला महिलांनी चावा घेऊन मारहाण केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात घडली. जखमी पुरुषाने दिलेल्या फिर्यादीवरुन दोन्ही महिलांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
याबाबत गणेश गोविंदा जाधव (वय 62 वर्ष) यांनी थाळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, 14 जूनला दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या घरासमोर रेखाबाई जाधव व तिचा पती रमेश जाधव यांच्यात भांडण सुरु होते. ते सोडवण्यासाठी गणेश जाधव गेले. त्याचा राग आल्याने संशयित रेखाबाई रमेश जाधव हिने त्यांच्या डोक्यात काठी हाणली. त्यांच्या गुडघ्यावरही मारहाण केली. तेव्हढ्यावर न थांबता त्यांच्या डाव्या हाताला चावा घेतला. दुसरी संशयित सतीबाई प्रेमराज जाधव हिनेही त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. दोन्ही हिलांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात भादंवि 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस नाईक रामोळे तपास करीत आहेत.