क्राईम ब्लास्ट ब्यूरो
नवरदेवाच्या मनात आलं…आपली वरात हट के निघाली पाहिजे…मग एकेक आयडिया काढत गेला..शेवटी ठरलं एकदाचं ! आणि लोकांनी पाहिलं…
25 बैलगाड्यांवर जाणारं वऱ्हाड !!!
स्वतः बैल हाकलत नेणारा नवरदेव काही साधासुधा नव्हता. तो होता चक्क सिव्हिल इंजिनीअर आणि त्याची वधूही इंजिनीअर होती. आशिष तानाजी यमगर असं त्या पठ्ठ्याच नाव ! सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातील चोरोची हे त्याचं गाव आहे. त्याचा विवाह नागोळ गावाच्या आशाराणी संजय मासोळ हिच्याशी ठरला. ती ही सिव्हिल इंजिनीअर आहे.
चोरोची गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगल कार्यालयात हा विवाह झाला. त्यासाठी घरापासून 25 बैलगाड्यातून वऱ्हाड गेलं. विशेष म्हणजे नवरदेव आशिष स्वतः एका गाडीला जुंपलेली बैलजोडी हाकलत होता. हे अनोखे वऱ्हाड पाहण्यासाठी ग्रामस्थांनी दुतर्फा गर्दी केली होती. बैलगाडीवरच वऱ्हाड पाहून जुने जाणते लोक स्वतःच्या भूतकाळात हरवले.