शिरपूरात गरजूंसाठी शिलाई मशीन, पिठाच्या गिरण्या व तिनचाकी सायकलींचे वाटप  //  मुकेशभाई पटेल सैनिक स्कूलचे खेळाडू जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जिल्हा अजिंक्य  //  खरेदीखताची नक्कल देण्यासाठी १० हजारांची मागणी; ४ हजार घेताना एसीबीची कारवाई  //  पुणे जिल्ह्यातील अत्याचार घटनांवर संताप; डॉक्टरांवर कारवाईची मागणी  //  शिरपुरात माता मृत्यूने खळबळ; बाळंतपणानंतर 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू  //  तालुक्यातील वन जमीन धारक आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी मंजूर;आ.अमरीशभाई पटेल यांच्या प्रयत्नांना यश  //  शिरपूरजवळ रिक्षा पलटी; एकाचा मृत्यूशिरपूर : तालुक्यातील साकवद–बाळदे  //  धुळे जिल्हा क्रिकेट संघाच्या 16 वर्षाखालील संघाची दिमाखदार कामगिरी   //  आमदार अमरिशभाई पटेल यांची दूरदृष्टी ठरली जलक्रांतीची दिशा…!  //  शस्त्रक्रियेत धक्कादायक हलगर्जी; महिलेच्या पोटात कापड राहिल्याचा आरोप, डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

बिजासन घाटात पुन्हा भीषण अपघात; चार वाहनांची साखळी धडक, दोन जखमी

शिरपूर/- तालुक्यातील अपघातांसाठी कुप्रसिद्ध ठरलेल्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात गुरुवारी पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. बिजासन चौकीसमोर भरधाव ट्रेलरने पुढे चाललेल्या तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने चार वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात एक मिनी ट्रक उलटला असून दोन जण जखमी झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वेगात असलेला ट्रेलर अचानक नियंत्रणाबाहेर गेला. त्याने प्रथम एका मिनी ट्रकला धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की संबंधित मिनी ट्रक रस्त्याच्या रेलिंगवर जाऊन आदळला व उलटला. त्यानंतर ट्रेलरने एमपी 07 जीए 5019 क्रमांकाच्या दुसऱ्या मिनी ट्रकसह एका स्कॉर्पिओलाही धडक दिली.
अपघातानंतर घाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच बिजासन पोलिसांनी व स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. चौकी प्रभारी रोहित पाटीदार यांनी तातडीने दोन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ट्रेलरमधील माल रस्त्यावर विखुरल्याने वाहतुकीवर काही काळ अधिक परिणाम झाला.


अपघातांची मालिका कायमच
बिजासन घाटात वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुरेशा सुरक्षात्मक उपाययोजना नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.


सुरक्षेसाठी उपाययोजनांची मागणी
बिजासन घाटात गणेश घाटच्या धर्तीवर तातडीने सुधारणा कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे. रस्त्याचे रुंदीकरण, वेगमर्यादा नियंत्रण, सूचना फलक व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!