हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

लग्नसराईत बालविवाहांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा; संबंधित सर्व घटकांवर जबाबदारी

नंदुरबार : जिल्ह्यात सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून या पार्श्वभूमीवर होणारे बालविवाह रोखण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने कडक पावले उचलली आहेत. बालविवाह ही प्रथा बालहक्कांच्या विरोधात असून ‘बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006’नुसार असे विवाह बेकायदा आहेत. अशा विवाहांमध्ये सहभागी होणाऱ्या तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी दिला आहे.
बालविवाह रोखण्याच्या दृष्टीने केवळ पालकांवरच नव्हे, तर विवाह प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विविध घटकांनाही जबाबदार धरण्यात येणार आहे. विवाह विधी पार पाडणारे धार्मिक गुरु व पंडित, तसेच मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यावसायिक, लॉन्स मालक आणि वाजंत्री यांच्यावरही कारवाई होऊ शकते. याशिवाय, गावात बालविवाह घडल्यास सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांनाही जबाबदार धरले जाणार आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, लग्न समारंभाशी संबंधित सर्व व्यावसायिकांनी कामाची ऑर्डर स्वीकारण्यापूर्वी नवरा-नवरीच्या वयाचे अधिकृत पुरावे तपासणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर बालविवाह प्रतिबंधाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बालविवाह थांबविण्यासाठी प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनीही अशा प्रकारांना विरोध करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!