हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना; शिरपुरात निदर्शने, प्रशासनाला इशारा

शिरपूर : आदिवासी समाजाचे आराध्य दैवत मानले जाणारे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेने शिरपूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या निषेधार्थ आदिवासी कोळी समाजाच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक यांना निवेदन देत कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवगाव येथे २ एप्रिल २०२६ रोजी अज्ञात समाजकंटकांनी पुतळ्याच्या चौथऱ्याची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून परिसरात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले की, राघोजी भांगरे हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून आदिवासी समाजाच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या पुतळ्याची विटंबना ही समाजाच्या स्वाभिमानावर झालेली गंभीर आघात असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, याआधीही सप्टेंबर २०२५ मध्ये अशाच प्रकारची घटना घडल्याची आठवण करून देत प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
तसेच, स्मारक परिसरातील सोलर दिव्यांची चोरी झाल्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षेचा अभाव असल्याचे अधोरेखित करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी दोषींना तात्काळ अटक, मुख्य सूत्रधारांचा शोध, पुतळ्याची त्वरित दुरुस्ती, कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या ठोस मागण्या केल्या.प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात नगरसेवक चंद्रकांत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विनायक कोळी, मोहन कोळी, राहुल ईशी, भिका चव्हाण, अजिंक्य शिरसाठ, समाधान कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!