हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

बोराडी येथे संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त बीज रोपण

शिरपूर : संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त तालुक्यातील बोराडी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष बीज रोपण उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गाव हरित व सुंदर करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला.
बोराडी ग्रामपंचायतीला नुकताच महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत राज्यात द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला आहे. या यशाबद्दल शासनातर्फे ट्रॉफी, मानचिन्हासह विविध वृक्षांच्या बिया पुरस्कारस्वरूप देण्यात आल्या. पुरस्कारानंतर गावाने पर्यावरण चळवळ अधिक प्रभावीपणे राबवावी, हा शासनाचा उद्देश असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून गावातील सार्वजनिक ठिकाणी बीज रोपण करण्यात आले. या उपक्रमात सरपंच सुखदेव भील, उपसरपंच राहुल रंधे, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे, सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी स्वतः बीज रोपण करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत संत गाडगेबाबांना मानवंदना दिली.
ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “माझी वसुंधरा अभियानातून मिळालेला सन्मान हा गावाच्या पर्यावरणीय बांधिलकीची पावती आहे. दिलेल्या बियांचे वृक्षात रूपांतर करून पुढील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा आमचा निर्धार आहे.”
या उपक्रमामुळे बोराडी गाव स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक बनण्यास निश्चितच चालना मिळणार असून, संत गाडगेबाबांच्या स्वच्छता व समाजसेवेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करण्यात आले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!