शिरपूरात गरजूंसाठी शिलाई मशीन, पिठाच्या गिरण्या व तिनचाकी सायकलींचे वाटप  //  मुकेशभाई पटेल सैनिक स्कूलचे खेळाडू जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जिल्हा अजिंक्य  //  खरेदीखताची नक्कल देण्यासाठी १० हजारांची मागणी; ४ हजार घेताना एसीबीची कारवाई  //  पुणे जिल्ह्यातील अत्याचार घटनांवर संताप; डॉक्टरांवर कारवाईची मागणी  //  शिरपुरात माता मृत्यूने खळबळ; बाळंतपणानंतर 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू  //  तालुक्यातील वन जमीन धारक आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी मंजूर;आ.अमरीशभाई पटेल यांच्या प्रयत्नांना यश  //  शिरपूरजवळ रिक्षा पलटी; एकाचा मृत्यूशिरपूर : तालुक्यातील साकवद–बाळदे  //  धुळे जिल्हा क्रिकेट संघाच्या 16 वर्षाखालील संघाची दिमाखदार कामगिरी   //  आमदार अमरिशभाई पटेल यांची दूरदृष्टी ठरली जलक्रांतीची दिशा…!  //  शस्त्रक्रियेत धक्कादायक हलगर्जी; महिलेच्या पोटात कापड राहिल्याचा आरोप, डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

महामार्गावरील खड्डयात फुलहार घालत नागरिकांचा रस्ता दुरस्तीसाठी ठिय्या आंदोलन

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्याच्या वळणावर दोन्ही बाजूस चार ते पाच फूट लांब आणि दोन तीन फुट खोल खड्डे मोठ्या प्रमाणावर पडले आहेत. त्याचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते व नागरीकांनी रस्त्यातील खड्ड्यात फुलहार घालून प्रतीकात्मक पूजन करुन ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर नागरीकांनी आंदोलन मागे घेतले.

 

 

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर असलेल्या परिवहन विभाग व एमबीसीपीएनएल कंपनीच्या हद्दीतील रत्यावर अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे अनेकवेळा लहान मोठे अपघात घडले आहेत. त्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. खड्ड्यांची दुरस्ती करण्यात यावी, याबाबत संबंधीत कंपनी व परिवहन विभागाला वारंवार निवेदन दिले. मात्र, संबंधीत कंपनीच्या प्रशासनाने दखल घेतली नाही. लाखो रुपयांचा टोल आणि कर वसूल करणाऱ्या प्रशासनाला मात्र या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यास वेळ मिळत नसल्याने वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.संतापलेल्या सामाजिक कार्यकर्ते राजेश सराफ, दिलीप कोळी, देवेंद्र यादव आदींनी रास्तारोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोडी झाल्याने सांगवी तालुका पोलिसांनी आंदोलनस्थळी येऊन नागरीकांनाची समजूत काढली. संबंधीत अधिकारी बीसीपी हेड विजय प्रभू, वाहतूक विभागाचे अधिकारी रवींद्र जाधव यांनी लवकरच रस्ता दुरस्ती करण्याचे आश्वासन दिले. वेळेत रस्त्याची दुरस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरीकांनी दिला.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!