हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

‘कामचुकार’ ग्रामसेवकांमुळे गावगाडा ठप्प; भाकपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

शिरपूर : तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या काही ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे ग्रामीण भागातील विकासकामे आणि प्रशासकीय कारभार ठप्प झाल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) केला आहे. यासंदर्भात भाकपाच्या शिष्टमंडळाने धुळे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन दोषी कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, अनेक ग्रामसेवक कर्तव्यावर असतानाही कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना साध्या दाखल्यांसह विविध कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. याशिवाय शासकीय निधीचा योग्य विनियोग न करणे, जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी जाणीवपूर्वक रेंगाळवणे, तसेच नियमांना धाब्यावर बसवून मनमानी कारभार करणे, असे प्रकार वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या कर्मचारी संघटनांच्या असहकार आंदोलनाचा आडोसा घेऊन प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही भाकपाने केला आहे. याचा फटका ग्रामीण भागातील गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला बसत असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.भाकपने दोषी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, ग्रामपंचायतींच्या कामकाजावर कडक नियंत्रण ठेवावे आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळेल अशी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा मागण्या केल्या आहेत. प्रशासनाने तक्रारींची दखल घेऊन तात्काळ पावले उचलली नाहीत, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाकपाने दिला आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!