क्राइम ब्लास्ट वृत्तसेवा
ताराबलम..चंद्रबलम म्हणून घरात आणलेली नवरी लग्नाच्या तिसर्या दिवशीच फुर्रकन उडून गेली. व्यथित झालेल्या तिच्या पतीने थाळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
शिरपूर तालुक्यातील सावेर गावात ही घटना घडली. तेथील अविनाश नगराज पाटील (वय 33) यांनी 15 फेब्रुवारीला स्नेहा (वय 23) हिच्यासोबत नाशिक येथे त्र्यंबकेश्वरमध्ये महादेवी मंदीर संस्थान येथे लग्न केले. तेथून ते रात्री दीडला सावेर येथे परत आले. 16 फेब्रुवारीला रात्री नऊला जेवण करुन घरातील सर्वजण झोपी गेले. 17 फेब्रुवारीला पहाटे पाचला नववधू स्नेहा अविनाश पाटील घरात कोणालाही न सांगता पळून गेल्याचे आढळले. अविनाश पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन थाळनेर पोलिस ठाण्यात बेपत्ता नोंद करण्यात आली आहे. हवालदार वळवी तपास करीत आहेत.