शिरपूरात गरजूंसाठी शिलाई मशीन, पिठाच्या गिरण्या व तिनचाकी सायकलींचे वाटप  //  मुकेशभाई पटेल सैनिक स्कूलचे खेळाडू जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जिल्हा अजिंक्य  //  खरेदीखताची नक्कल देण्यासाठी १० हजारांची मागणी; ४ हजार घेताना एसीबीची कारवाई  //  पुणे जिल्ह्यातील अत्याचार घटनांवर संताप; डॉक्टरांवर कारवाईची मागणी  //  शिरपुरात माता मृत्यूने खळबळ; बाळंतपणानंतर 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू  //  तालुक्यातील वन जमीन धारक आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी मंजूर;आ.अमरीशभाई पटेल यांच्या प्रयत्नांना यश  //  शिरपूरजवळ रिक्षा पलटी; एकाचा मृत्यूशिरपूर : तालुक्यातील साकवद–बाळदे  //  धुळे जिल्हा क्रिकेट संघाच्या 16 वर्षाखालील संघाची दिमाखदार कामगिरी   //  आमदार अमरिशभाई पटेल यांची दूरदृष्टी ठरली जलक्रांतीची दिशा…!  //  शस्त्रक्रियेत धक्कादायक हलगर्जी; महिलेच्या पोटात कापड राहिल्याचा आरोप, डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

इंजिनीअरचा नादच खुळा, 25 बैलगाड्यातून नेलं वऱ्हाड

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

नवरदेवाच्या मनात आलं…आपली वरात हट के निघाली पाहिजे…मग एकेक आयडिया काढत गेला..शेवटी ठरलं एकदाचं ! आणि लोकांनी पाहिलं…

25 बैलगाड्यांवर जाणारं वऱ्हाड !!!

स्वतः बैल हाकलत नेणारा नवरदेव काही साधासुधा नव्हता. तो होता चक्क सिव्हिल इंजिनीअर आणि त्याची वधूही इंजिनीअर होती. आशिष तानाजी यमगर असं त्या पठ्ठ्याच नाव ! सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातील चोरोची हे त्याचं गाव आहे. त्याचा विवाह नागोळ गावाच्या आशाराणी संजय मासोळ हिच्याशी ठरला. ती ही सिव्हिल इंजिनीअर आहे.

चोरोची गावापासून 10  किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगल कार्यालयात हा विवाह झाला. त्यासाठी घरापासून 25 बैलगाड्यातून वऱ्हाड गेलं. विशेष म्हणजे नवरदेव आशिष स्वतः एका गाडीला जुंपलेली बैलजोडी हाकलत होता. हे अनोखे वऱ्हाड पाहण्यासाठी ग्रामस्थांनी दुतर्फा गर्दी केली होती. बैलगाडीवरच वऱ्हाड पाहून जुने जाणते लोक स्वतःच्या भूतकाळात हरवले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!