
शिरपूर (प्रतिनिधी) : शहरातील मांडळ शिवारातील चंद्रमौली नगर परिसरात शुक्रवारी दुपारी मुलानेच आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गंगा महतो (५०) व रंजू देवी महतो (४२, मूळ बिहार) अशी मृतांची नावे आहेत. चंदन महतो या त्यांच्या एकुलत्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महतो कुटुंबीय नुकतेच बिहारमधील मुलीच्या विवाहासाठी गेले होते. शुक्रवारी सकाळी ते शिरपूरला परतले. दुपारी सुमारे २ वाजता चंदनने संतापाच्या भरात घरातील मुसळाने आई-वडिलांच्या डोक्यावर वार केले. दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
पत्नीसमोर आई-वडिलांनी अपमानास्पद बोलल्याचा राग मनात धरून चंदनने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजित जाधव व पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली.गुन्ह्या दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती
